achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीमुळे विशाल बिराजदार यांचे जीवन स्थिरतेकडे

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 7, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीमुळे विशाल बिराजदार यांचे जीवन स्थिरतेकडे
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव


शासकीय नोकरीमुळे जीवनाला स्थैर्य लाभते,तसेच जनतेची सेवा करण्याची संधी मिळते.याच शासकीय नोकरीसाठी अनेक युवक-युवती स्पर्धा परीक्षा देऊन परिश्रम घेत असतात.मात्र,सर्वांनाच त्या परीक्षेत यश मिळतेच असे नाही.धाराशिव येथील युवक विशाल रामलिंग बिराजदार यांची कहाणी याचेच उदाहरण आहे.

विशालचे वडील भूम येथील दुग्धशाळेत कार्यरत असताना २१ डिसेंबर २०१३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.त्यानंतर कुटुंबातील भावंडांनी अनुकंपा तत्वावर विशालला नोकरी द्यावी, अशी विनंती दुग्धशाळा कार्यालयाकडे आणि प्रशासनाकडे केली.या मागणीचा पाठपुरावा जवळपास १२ वर्षे सतत करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये राज्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.त्यानुसार विशाल बिराजदार यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि ४ ऑक्टोबर २०२५ रोजी धाराशिव येथे आयोजित जिल्हा रोजगार मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आला.विशाल यांनी जिल्हा कोषागार कार्यालय,धाराशिव येथे लिपिक-टंकलेखक या पदावर रुजू होऊन शासकीय सेवेत प्रवेश केला आहे.यामुळे जीवनात स्थैर्य आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

विशालचे मोठे भाऊ पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असून विवाहानंतर पुण्यात स्थायिक झाले आहेत.विशालने देखील वाहन चालविण्याचा परवाना काढून पुणे येथे खाजगी कंपनीत वाहन भाड्याने चालवण्याचे काम सुरू केले होते. महिन्याला २५ ते ३० हजार रुपये मिळत असले तरी खाजगी नोकरीत कायमस्वरुपाची हमी नसल्याची जाणीव त्याला होती.त्यामुळेच तो सातत्याने अनुकंपा तत्वावरील शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील होता.दरम्यान,शासकीय नोकरी मिळावी म्हणून तो दुग्धशाळा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत राहिला.वर्षानुवर्षे कागदपत्रांचा पाठपुरावा केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयामुळे त्याला वडिलांच्या जागी शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले.

या शासकीय नोकरीमुळे आता त्याला व कुटुंबाला चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.दोन्ही मुलींना योग्य शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवावे हे माझे स्वप्न असल्याचे विशाल यांनी सांगितले.शासकीय नोकरीमुळे आता ते पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे,अशी भावना विशाल बिराजदार यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झाल्याचे सांगून विशालने राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

Previous Post

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा आनंद

Next Post

एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा

एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025